२०२४ ला होणान्या यवतमाळ वाशीम लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार
पुसद प्रतिनिधी : –
वसंतराव नाईक साहेब यांच्या गृह तालुक्यातील ईसापुर धरण ४० कि.सी लांबी व ७ कि.मी. रुंदी असलेल्या धरणाला ५० गावातील शेतकऱ्याची पूर्णत्ता जमीन गेली , परंतु नाईक साहेबानी ही ५० गावाच्या शेतकऱ्याच्या शेतीला पाणी मिळावे है स्वप्न मनाशी बाळगुन धरणाची निर्मीती केली होती.
१९८० पासुन त्या धरणाचा पाणी डावे व उजवे कालवे चालु झाले व नांदेड, कर्नाटक, तेलंगानाध्या शेतक-याला पाणी मिळत आहे, परंतु या ५० गावाचे शेतकरी ४० वर्षापासुन सरकारकडे कृती समितीचा वतीने वारंवार सबंधित विभागाच्या आमदार/खासदार शासनाकडे मागणी केलेली आहे,असून सुद्धा आजपर्यँत नमिळणे हे दुर्भाग्य की, शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळावं म्हणून कधीही विधीमंडळामध्ये अर्थ संकल्पीय अधिवेशनामध्ये चर्चा दिसुन आली नाही. व लोक प्रतीनीधीचा वापर केला नाही, फक्त या भागातील शेतकरी, मजुरदार वर्ग मतदान करत आलो. पंरतु आमच्या भागाचे प्रश्न कोणत्याही सरकारने पुर्ण केले नाही. त्यामुळे येणाऱ्या २०२४ घ्या लोकसभेच्या उमेदवाराला ५० गावाच्या शेतकरी, मजुरदार वर्गाच्या वतीने मतदान करणार नाही.
हे ही वाचा 👉 आशा वर्करची ऑर्डर काढण्याकरिता एक लाख रुपयांची मागीतली लाच | Pusad
यवतमाळ वाशिम लोकसभेच्या निवडणुकीवर ५० गाव माळपठार शेतकन्यांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्या बाबतचे ६ मार्च २०२४ रोजी तहसील कार्यालय ,पुसद येथे निवेदन देण्यात आले.
यावेळेस श्री.डॉ. एम.आर राठोड ग्रा.प.सदस्य, हिवळणी त.तथा माळपठार लिप्ट एरीकेशन कती समिती अध्यक्ष, एम जि चव्हाण मा.ग्रा.प.सदस्य, युवराज चव्हाण, कैलास राठोड माजी उपसरपंच, रमेश सोमला जाधव माजी सरपंच, रमेश सोमला पवार माजी सरपंच कुंभारी, सुनिल मोहन राठोड था.प.सदस्य मांजरजवळा व सर्व माळपठारावरील शेतकरी इत्यादी उपस्थित होते .
– ब्युरो रिपोर्ट रॉ भारत –




